Saturday, July 18, 2020

एक कटू सत्य - लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा



lagnasathi mulinchya apeksha
life partner kasa asava

एक कटू सत्य - लग्नासाठी मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा 


लग्नाचं वय. गैरसमज नसावा. नीट विचार करा

सर्व मुलांनो मुलींनो व त्यांच्या पालकांनो कुठेतरी थांबायला शिका रे!! सर्वसाधारणपणे १८/१९/ 20/ 21व्या वर्षि मुलगी वयात येते या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही स्वरूप दिसतात  मुळातच सुंदर असल्या, तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात.!! विविध लग्नसमारंभात कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात!!


आणि बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात .
विचारणा होते, 

त्यावेळी!!!

पण .पण पण

स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले, तरी मुलीच्या वडिलांच्या डोक्यात वारं शिरतं.

ते अचानक भाव खायला लागतात. 

  • त्यांचे उत्तर लगेच तयार असते : 
  • मुलीला अजुन शिकायचे आहे,
  • करीयर करायचे आहे,​​
  • स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे"
असे सांगुन अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात


मग काय, मुलगीपण अभ्यासाला लागते.

चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते,
पण  नुसत्या डिग्रीने काय होते,  अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल,
असे म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. 

अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते. चेहऱ्यावरील गोडवा कमी कमी होत जातो. पुर्वीच्या पिढीत म्हणजे पंधरा वीस वर्षापुर्वीपर्यंत पंचविशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या


मग,  

मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.
बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा? त्याला पण एक मर्यादा असते :
  • सरकारी नोकरीच हवी, किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा,
  • किंवा खुप खुप पगार असावा,
  • तसेच त्याच्याकडे गाडी-फ्लॅट हवा,
  • दिसायला चांगला हवा,
  • वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको,
  • एकुलता एक शक्यतो नसावा,
  • सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां
  • आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत,
  • धंदेवाईक नको, पण व्यावसायिक हवा, परंतु त्यांना हे देखील काळात नाही कि या दोन्हीचा अर्थ हा एकाच आहे
  • शेतकरी तर नकोच, पण शेती मात्र हवी आहे, कारण शेती करायला नाही आवडत ना. 
  • फक्त पुणे मुंबई बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा किंवा US/UK त असावा.
  • काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात, याला मर्यादाच नाही
  • बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. 
  • प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८/२९वर येवुन पोहोचते
  • पोरगी नोकरी करायला लागली असेल तरी, किंवा नोकरी लागली नाही तरी,
  • जिथे नोकरी करते, त्याच गावातील स्थळ हवे. आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा, या नादात वये वाढत जातात. 

निसर्गनियमानुसार चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. 
तरीसुद्धा अजुनही तडजोड करायची तयारी नसते.


मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात. सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो. हे तर खूपच बरे २८/३० त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते.
अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावर किंवा दोनतीन वर्षा नंतर मुल आणायचे असे यांचे महान विचार 


शरीरात अनेक हार्मोन्स बदल झालेले असतात तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.


मग
मग काय? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे. त्यांना स्वतःचेच सुधरत नाही, तर त्या काय पोरींचे बाळंतपण व पुढचे सोपस्कार काय करतील?  पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.

नंतर मग :

मग काय ?
४/६ महीन्याचे बाळ आईच्या/सासुच्या देऊन चालल्या नोकरीवर त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही.


खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. पण यांना कोण समजवणार??


म्हणुन कीं मुलि आणि मुलांनो,

सर्व मुलींनोआणि मुंलांनो त्यांच्या पालकांनो, आपल्या अपेक्षा कमी करा काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका हो!! आणि कुणि फोन करून चौकशि केलि तर एकमेंकाना घोळवत ठेवन्यापेक्षा जे कारन असेल ते स्षष्ट सांगत चला. संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतचं.
काही चुकीचे वाटल्यास क्षमा असावी.

सोन्याचा साठा करुन मिळविलेल्या श्रीमंतीपेक्ष्या जीवनातील बऱ्याच गोष्टी वेळेवरच करण्याचा प्रयत्न करत राहा तीच खरी श्रीमंती सर्वच या विचारांशी सहमत असतील असे नाही पण हा लेख म्हणून प्रत्येक लग्न कार्यालयाच्या बाहेर जरूर लिहावा, सर्वसामान्य व्यक्तींनी जरूर विचारात घ्यावा.


lagnala mulgi pahije
jodidar kasa asava


लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा :

सगळ्याच मुली म्हणतात आम्हाला मुलगा इंजिनिअर पाहिजे, 
त्याचा जॉब सरकारी असावा, नाहीतर नोकरीत चांगल्या पोस्टला कायमस्वरूपी पदावर कार्यरत असावा. 
पगार कमीत कमी 40000/- असावा
शेती पण भरपूर पाहिजे 

आणि वरतून मुलांनाच टोमणे मारायचे की मुलांच्या खूप अपेक्षा असतात पाहिले तुम्ही तुमच्या अपेक्षा कमी ठेवा एखाद्या इमानदार निर्व्यसनी गरीब घरातील मुलांना ते हो म्हणणार नाही, ज्याच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे तो दिसायला कसा पण असला तर चालतो तो दारू पिवून गटारात लोळणारा चालतो. 

पण एखाद्या इमानदार मुलाला हो म्हणणार नाही.  मुली आणि मुलीचे वडील आणि घरचे आणि मग नंतर लवकर घटस्फोट होतात मुलाची खरी परिस्थिती नंतर माहीत पडते लग्न झाल्यानंतर मग तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते​​

यांना घर गावात पण वाढलेलं पाहिजे आणि शहरात पण स्वतःच घर पाहिजे शहरात स्वतःच घर पाहिजे तर मग गावाकडे घर बांधलेले कशाला विचारता मग गावाकडच्या घर शेती कमी आणि घर साधं असल तर ते पण नाही चालत आणि गावाकडे चांगलं घर आहे तर शहरात पण ​​घर पाहिजे यांना फक्त प्रॉपर्टी वाला मुलगा पाहिजे मग तो कसा पण असो लफडेखोर असो दारू पिणारा असो दिसायला फॅन्ड्री तल्या जब्या सारखा पण चालतो. 

एक वेळ मुलीच्या आई वडिलांनी देखील विचार करायला हवा कि, मुलगा 26,27 वयामध्ये स्वतःच घर घेणं शहरामध्ये कसं काय शक्य आहे.  
मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे कमवता आहे हे महत्वाचे. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याचे स्वप्नं आणि ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी मेहनत हि फक्त आणि फक्त स्वावलंबी व्यक्तीच करू शकतो. मुलगा हा त्याचे  आई वडील यांच्या वर अवलंबून नाही हे महत्वाचे असते . 


​पणकुणा मध्यमवर्गीय मुलाला नाही देणार थोड्या अपेक्षा कमी करून त्यांच्या आणि कुणा मुलाने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी लग्न करायला तयार आला तर ते यांना चालत नाही आणि मुलगी 23 वर्षाची आहे आणि मुलगा 40 वर्षाचा आहे ते चालते घटस्फोटित डिव्होर्स विधवा विधुर या मुलींच्या अपेक्षा पण वाढून गेल्याल्या आहेत 

हेच लोक अगोदर मुलाची प्रॉपर्टी बघून फसतात पण लग्नाच्या अगोदर चौकशी करणार नाही आणि चांगल्या मुलांना पण बदनाम करतात.  

पण एखाद्या गरीब मध्यमवर्गीय हुशार मेहनती इमानदार निर्व्यस​​नी मुलाला देणार नाही हे आणि मग देतात द्दुसाऱ्या जातीच्या मुलांमध्ये करतात लग्न नाही खूप प प्रॉपर्टी च्या लालचे पायी मुलींचे लग्न थांबवून ठेवतात आणि मुलीचे वय वाढत जाते.

जर लग्न जमू लागले कि, 

म्हणजे मुलीचे आई बाबा यांना एखादा मध्यमवर्गीय मुलगा पसंद आला, सर्व काही ठीक आहे, तर अचानक मुलीकडचे नातेवाईक / मामा/ काका / आत्या हे लोक मुलीच्या आई बाबांचे कां भरतात, कि मुलगा private नोकरी करत आहे, निकरी चे काही खर नसते , 

जरी मुलाचे स्वतःचे घर आहे परंतु कधीही काम सुटू शकते, त्यासाठी मुलाला किमान २ एकर शेती असायला हवी. मग हे ऐकून मुलीचे आई बाबा विचार करायला लागतात. आणि शक्यतो मुलाला लग्नासाठी थेट नकार देखील देतात . 

नातेवाईकांचे ऐकुन मुलाला नकार देणाऱ्या पालकांसाठी मी हेच सांगू इच्छितो : 
उच्चशिक्षित मुलगा जर वयाच्या २५ वर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरीत रुजू झाल्यावर तो लगेच ३ ते ४ वर्षात लगेच घर कसे घेऊ शकतो. 

मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या अशा वागण्याने तरुण मुलांचे मानसिक खच्चीकरण होत आहे हि बाब त्याच्या लक्षात येत नाही, 

बऱ्याचदा मुलांची अपेक्षा खूप काही नसते, मुले सर्व गोष्टी समजून घेण्यासही तयार असतात, 

माझ्या मित्रानो, जर आपण मुलगी लग्नासाठी मुलगी बघत असाल तर आणि तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील किंवा येत असतील तर दुःखी होण्याचे काही कारण नाही, कारण अशी अपेक्षा करणे हे त्यांचे विचार असतील तर तुम्ही समाजातील अशा लोकांचा विचार करून स्वतःला कमी समजून नका घेऊ. 

माझ्या मते, ह्या गोष्टींचे दुःख करत बसण्यापेक्षा, त्याऐवजी तुम्ही अनाथ आश्रम मधील मुलीसोबत तुम्ही विवाहबद्ध होऊ शकता, कारण हि विचारसरणी देखील उत्तम आहे, त्या एका अनाथ मुलीचे कल्याण होईल. हे तुमचे मोठेपण अनाथ मुलगी कधीच विसरू शकणार नाही, लालची लोकांसोबत सोयरीक जुळवण्यापेक्षा हा पर्याय योग्य आहे असे मला वाटते. 

अनाथ मुलगी शेवट पर्यंत तुम्हाला ईश्वराचा दर्जा देईल.

धन्यवाद !!!


काही चुकले असेल तर क्षमा असावी.........

This Is The Newest Post